सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील डोंगरे यांचे योगदान कौतुकास्पद -राणीताई लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राष्ट्रीय जीवन गौरव व आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेत व गावात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गावातील सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांना नाशिक येथील भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव व आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नुकतीच निमगाव वाघा ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा पार पडली. यामध्ये सरपंच लताबाई फलके यांनी डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव, संजय कापसे, सुजाता कापसे, अनिल डोंगरे, अरुण कापसे, कचरु कापसे, विलास वैराळ, प्रकाश गायकवाड, अजय ठाणगे, शिवाजी पुंड, सोमनाथ आतकर, ओमकार फलके, नवनाथ फलके, दिपाली कदम, पिंटू जाधव, संगिता आतकर, कार्तिकी रोहकले आदी उपस्थित होते.
तर गावात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके व प्रहारचे सहसचिव संजय पुंड यांनी डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी उद्योजक अजय लामखडे, भाऊसाहेब कदम, अभिजीत पाचारणे, जालिंदर आतकर, दिपक जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
राणीताई लंके म्हणाल्या की, डोंगरे यांचे विविध क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. डोंगरे यांनी सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक क्षेत्रासह त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच लताबाई फलके यांनी समाजासाठी निस्वार्थपणे सुरु असलेले डोंगरे यांचे कार्य अभिमानास्पद आहे. गावातील राजकारणापेक्षा समाजकारणात स्वत:ला झोकून देऊन त्यांचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, ग्रामस्थांनी पाठीवरती दिलेली कौतुकाची थाप आनखी समाजकार्य करण्यास बळ देणारी आहे. समाजकारण हेच प्रमुख ध्येय समोर ठेऊन कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.