• Wed. Nov 5th, 2025

राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मारुती पवार यांचा सत्कार

ByMirror

Oct 19, 2023

युवकांसह जनसामान्यांना पक्षाला जोडण्याचे काम सोशल मीडियाद्वारे होत आहे -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेली विकास कामे व कल्याणकारी योजना जनते पर्यंत पोहचण्याची गरज आहे. योजनेची माहिती मिळाल्यास त्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना घेता येणार आहे. पक्षाची ध्येय-धोरण, विकास कामे व कल्याणकारी योजना जनते पर्यंत घेऊन जाण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी ठरत आहे. युवकांसह जनसामान्यांना जोडण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. पक्षाने सोशल मीडिया ही वेगळा विभाग तयार करुन पदाधिकारी नियुक्त केले आहे. मारूती पवार यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली असून, ते उत्तमपणे कार्य करणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी केले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्‍मा आठरे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, कामगार अध्यक्ष गजानन भांडवलकर, उमेश धोंडे, रोहन शीरसाठ आदी उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप यांनी युवा वर्ग सोशल मीडियाशी मोठ्या प्रमाणात जोडला गेलेला आहे. त्यांच्या पर्यंत पक्षाचे कार्य सहजपणे घेऊन जाता येणार आहे. शहरात पक्षाच्या माध्यमातून युवकांसह सर्वच क्षेत्रात उत्तमपणे संघटन सुरु असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी पवार यांना नियुक्तीबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अभिजीत खोसे म्हणाले की, राष्ट्रवादीत प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. मारूती पवार हे अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. आमदार संग्राम जगताप यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख झाली आहे. राष्ट्रवादीच्या शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक कार्य व युवकांमध्ये असलेला जनसंपर्काची दखल घेऊन त्यांची सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड अभिनंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेश्‍मा आठरे यांनी युवा वर्ग सोशल मीडिच्या माध्यमातून अधिक प्रभावीत होत आहे. त्या दृष्टीकोनाने या विभागाच्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाचे कार्य पुढे घेऊन जाण्यास मोठी जबाबदारी असल्याचे सांगून पवार यांचे अभिनंदन केले.


सत्काराला उत्तर देताना मारुती पवार यांनी पक्षाचे ध्येय-धोरण व आमदार संग्राम जगताप यांचे विकास कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाणार आहे. तर मोठा युवा वर्ग त्यांना जोडण्यासाठी प्रभावीपणे कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *