• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

टाळ, मृदंगाच्या निनादात केडगावला अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ

ByMirror

Feb 12, 2023

श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमिचा धार्मिक उपक्रम

वारकरी संप्रदायामुळे समाजात संस्कृती व संस्कार टिकले -सुवर्णाताई जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव उदयनराजेनगर येथे श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्‍वरी व शिवलीलामृत पारायण सोहळ्याला धार्मिक वातारवणात सुरुवात झाली. टाळ, मृदंगाच्या निनादात श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराजांच्या जयघोषाने भक्तीचा गजर करीत हा सोहळा रंगला आहे. या सप्ताहाचे हे नऊवे वर्ष आहे.


श्री विश्‍वेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात सुरु झालेल्या या धार्मिक सप्ताहाचे उद्घाटन रविवारी (दि.12 फेब्रुवारी) माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई सचिन जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक सचिन भानुदास कोतकर, नगरसेवक गणेश कवडे, मनोज कोतकर, सुनील (मामा) कोतकर, विजय पठारे, नगरसेविका लताताई शळके, शकुंतला पवार, ह.भ.प. महेश महाराज मडके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, अशोक कराळे, मुकुंद दळवी, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उद्योजक जालिंदर कोतकर, प्रसाद आंधळे, राजू सातपुते, ह.भ.प. मुंडे महाराज, धाडे महाराज, मोकाटे महाराज, क्षीरसागर महाराज, सुधीर कार्ले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


ह.भ.प. महेश महाराज मडके म्हणाले की, कलियुगात भाविकांना नामस्मरणाने ईश्‍वर प्राप्तीचा सुख मिळतो. धकाधकीच्या जीवनात भक्तीमार्गाने जीवनात सुख, समाधान निर्माण होत असतो. सुख, समाधान प्राप्तीसाठी धर्म मंडपाशिवाय पर्याय नाही. येथूनच परमार्थाचा खरा मार्ग सापडतो. अखंड हरिनाम सप्ताहाने भावी पिढीवर संस्कार रुजत असतात. भरकटलेल्या युवक-युवतींना दिशा देण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे ते म्हणाले.


सुवर्णाताई जगताप म्हणाल्या की, वारकरी संप्रदायामुळे समाजात संस्कृती व संस्कार टिकले आहेत. समाजप्रबोधनाने समाजाला दिशा दिली जात आहे. जीवनाला भक्तीमार्ग दाखविण्यासाठी युवकांना अखंड हरिनाम सप्ताह दिशादर्शक ठरत आहे. धार्मिकतेला समाजसेवेची जोड मिळाल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सप्ताहाच्या प्रारंभी कलश, प्रतिमा, तुलसी, ग्रंथ व वीणा पूजनाचा धार्मिक सोहळा पार पाडला. पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांनी केले. यावेळी धनेश कोठारी, मुकुंद धूत, निरज काबरा, निलेश गुगळे, अमित आनेचा, उमेश क्षीरसागर, मनोज बोथरा, धीरज लोढा, संतोष कोतकर, मच्छिंद्र भामरे, विशाल सकट, विठ्ठल पवार, मयुर जगदाळे, सचिन सातपुते, योगेश कुमठेकर, मनोज येरकर, विजय कराळे, राहुल आंग्रे, नितीज आजबे, संतोष मोटे, रोहित धांडे, पप्पू कोकाटे, महेश वाळके, करण गोफणे, रुपेश गुगळे, संतोष बोरा, जयदत्ता खाकाळ, युवराज कोतकर, गुलाब पवार, आदित्य कुलकर्णी, महेश गुंड, माऊली जाधव, भाऊसाहेब कोल्हे, ज्ञानेश सातपुते आदींसह विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, केडगाव परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इथापे यांनी केले.


या सप्ताहात ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे (श्रीरामपूर), सागर महाराज शिर्के (भीमाशंकर), भागवताचार्य दत्तात्रय महाराज हुके (परांडा), विकास महाराज शास्त्री (जामखेड), गौतम महाराज बेलगावकर (आळंदी), हरिदास महाराज पालवे शास्त्री (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे. तर बुधवारी (दि.15 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी 8 वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन रंगणार आहे. सप्ताहातंर्गत दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्‍वरी व शिवलीलामृत पारायण, सायंकाळी हरिपाठ व महाआरती तर रात्री हरिकीर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी चहा नाष्ट्यासह दुपारी व संध्याकाळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


रविवार दि.19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भागवताचार्य ह.भ.प. महेश महाराज मडके (नेवासा) यांच्या काल्याचे किर्तनाने या सप्ताहाचा समारोप होणार आहे. या धार्मिक सोहळ्यास केडगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याची आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *