• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

लोककलावंत (गोंधळी) संजय जाधव यांचे निधन

ByMirror

Aug 4, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील लोककलावंत (गोंधळी) संजय भैरवनाथ जाधव यांचे नुकतेच ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षाचे होते.


गोंधळी म्हणून ते जिल्ह्यात प्रसिध्द होते. जागरण-गोंधळ, नवरात्र मध्ये देवीचे गाणे व विविध धार्मिक गीत सादर करणारे ते लोककलावंत होते. त्याचबरोबर धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, दोन भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *