• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

सजीव चैतन्य अध्यात्म! पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने पुढाकार

ByMirror

Oct 14, 2023

नागरिकांमध्ये मतदानाबाबतची पावित्र्य भावना निर्माण करण्याचा संकल्प

अहमदनगर (प्रतिनिधी)- देव आणि देश हा भारतासाठी महत्त्वाचा विषय असल्याने देशातील तमाम जनता जनार्दन व वनसृष्टीसह वन्य प्राणी आणि सर्व सजीव सृष्टी हीच खऱ्या अर्थाने देवाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे भारतात सजीव चैतन्य अध्यात्म हे नवे तत्त्वज्ञान राबवण्याचा पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबतची पावित्र्य भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


स्वातंत्र्योत्तर 75 वर्षात अनेक सार्वत्रिक निवडणुका झाल्या, परंतु गेल्या 30-35 वर्षात वोटमाफीया यांनी जातीच्या नावावर किंवा पैशाच्या बदल्यात कोंबडी, दारु देऊन सातत्याने मत खरेदी केली. त्यामुळे अनेक गुन्हेगार आणि समाजकंटक मागच्या दाराने सत्तेत आले. अनेक सामाजिक संघटनांनी गेली 30 ते 40 वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढा चालू ठेवला. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने यश येऊ शकले नाही ही शोकांतिका आहे.


देवाच्या सानिध्यात किंवा मंदिरात कोणतेही चुकीचे पाऊल टाकले जात नाही, कारण त्या बाबतीत लोकांच्या मनात पावित्र्य असते. देशातील जनता जनार्दन सजीव सृष्टी हे खरोखर सजीव चैतन्य आहे. त्यामुळे परमेश्‍वरा इतकेच त्यांना मानले पाहिजे. हा देश म्हणजेच या देशातील जनता जनार्दन आणि लोकांचे कल्याण करण्याचे क्षमता फक्त लोकशाही सरकारमध्ये आहे. त्यामुळे देवा इतकेच महत्त्व देशाला दिले पाहिजे. देशाचे कल्याण करण्याचा जवळचा मार्ग म्हणजे मतदान प्रक्रिया आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक मतदानाच्या मनात मतदानाबाबतची पावित्र्य भावना निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश सजीव चैतन्य अध्यात्माचा राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


कॉ. बाबा आरगडे यांच्या नेतृत्वाखाली ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, जालिंदर बोरुडे, ॲड. लक्ष्मण पोकळे आदी कार्यकर्त्यांनी या नवीन सजीव चैतन्य अध्यात्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात धर्माचे आणि देवाच्या नावावर अनेक युद्ध झाले. त्यामुळे धर्म व देवांच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनात खऱ्या अर्थाने पावित्र्य आजही रुजलेले नाही. कायद्याने लोकांचे कल्याण करता येते, ही बाब नवी राहिलेली नाही.

त्यामुळे कायद्याचे राज्य म्हणजे समृद्धीचे राज्य आणि त्यासाठी देशातील जनता जनार्दनाचे कल्याण करण्यासाठी मतदानाचे पावित्र्य आजच्यापेक्षा हजारो पटीने वाढविण्याची गरज आहे. जगभरात आस्था, आपुलकी, प्रेम या मानवी भावनांचा पुरेपूर वापर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह व अहिंसेच्या स्वरूपात केला. त्यामुळे भारतात पैशाच्या बदल्यात मत खरेदी करण्याचा घातक प्रयोग थांबण्याची नितांत गरज आहे. यासाठी देश आणि देव दोन्ही पावित्र्य आहेत. देशातील जनता म्हणजे देश आणि त्यांचे कल्याण आणि देशाची भक्ती फक्त मतदानात मोठ्या प्रमाणात सामावलेली असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *