• Wed. Oct 15th, 2025

केडगाव देवी मंदिर परिसरात भाविकांना फराळ वाटप

ByMirror

Oct 1, 2025

मंदिर परिसरात स्वच्छता अभियान


नवरात्रोत्सवानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने केडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात फराळ वाटप करण्यात आले. तर मंदिराचे पावित्र्य राखत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना खिचडी, चिवडा व केळीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मंदिर परिसरात ग्रुप सदस्यांनी स्वच्छता करून मंदिर परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, जहीर सय्यद, सचिनशेठ चोपडा, सर्वेश सपकाळ, राजेंद्र चंगेडिया, मेजर दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, दीपकराव धाडगे, सुधीरशेठ कपाळे, सरदारसिंग परदेशी, अविनाश जाधव, रतनशेठ मेहेत्रे, विलासराव आहेर, दीपकराव घोडके, अशोकराव पराते, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, सुंदरराव पाटील, अविनाश काळे, अविनाश पोतदार, दिलीपशेठ गुगळे, सुभाष पेंढुरकर, विठ्ठल (नाना) राहिंज, अनिलराव सोळसे, दशरथ मुंडे, योगेश चौधरी, सखाराम अळकुटे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, सार्थक साठे, जयराज अवचर, सुहास देवराईकर, दत्तात्रेय लाहुंडे, संजय भिंगारदिवे, रवींद्र जाजू, श्रीरंग देवकुळे, रामनाथ गर्जे, शेषराव पालवे, प्रकाश देवळालीकर, विनोद खोत, कुमार धतुरे, राजू शेख, दिनेश शहापूरकर, नीता देवराईकर, राजश्री राहिंज, प्रांजली सपकाळ आदी सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते.


संजय सपकाळ म्हणाले की, नवरात्र हा भक्तिभाव, शक्तीपूजा आणि समाजकार्याचा संदेश देणारा उत्सव आहे. देवीची उपासना करताना केवळ आरती आणि दर्शनापुरते मर्यादित न राहता स्वच्छता, अन्नदान व समाजसेवा या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे. नवरात्र उत्सवात दरवर्षी ग्रुपच्या माध्यमातून भाविकांना प्रसाद वाटप केले जात आहे. केडगाव देवी मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना प्रसादरुपी फराळ वाटप करुन सेवा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.


सचिनशेठ चोपडा म्हणाले की, नवरात्र हा भक्ती व शक्तिपूजेचा उत्सव आहे. या उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन हरदिनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. भाविकांना फराळ वाटप करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छतेमुळे भक्ती अधिक पवित्र होते आणि प्रसन्न वातावरणात श्रद्धेला बळ मिळते. निरोगी आरोग्यासाठी देखील सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *