जय युवा अकॅडमी, रयत प्रतिष्ठान, जय असोसिएशन ऑफ एनजीओ, माळीवाडा तरुण मंडळाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रबोधनात्मक उपक्रमांची सर्व समाजाला गरज आहे. समाज जागृतीने प्रश्न सुटणार आहे. महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी समाजात परिवर्तनासाठी उभे आयुष्य खर्च केले. जुन्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर मात करून शिक्षणाची मुहूर्तमेढ फुले दांम्पत्यांनी रोवली. शिक्षणामुळे समाज प्रगत होत असल्याचे प्रतिपादन जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे यांनी केले.
जय युवा अकॅडमी, रयत प्रतिष्ठान, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, माळीवाडा तरुण मंडळाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी अॅड. शिंदे बोलत होते. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, महापौर रोहिणीताई शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, प्रा. माणिक विधाते, दत्ता जाधव, नगरसेविका सुवर्णाताई जाधव, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अॅड. सुनिल तोडकर, डॉ. अमोल बागुल, डॉ. रणजित सत्रे, अॅड. धनंजय जाधव, नगरसेविका सुप्रिया जाधव, अभय आगरकर, स्वाती सुडके, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. भास्कर रणनवरे, रजनी ताठे, आरती शिंदे, रावसाहेब काळे, नगरसेवक अनिल बोरुडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, सुनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाभरातील सामाजिक संस्था अतिशय प्रभावीपणे समाजकार्य करीत आहेत. समाजप्रबोधनासाठी कलाकार स्वातंत्र्यपुर्व काळापासून जनजागृती करून समाजाला जागृत करीत आहे. समाजालाही इतिहासाची महती कलावंत प्रभावीपणे मांडू शकतात. तसेच समस्या सोडविण्यासाठी कलाकार प्रबोधनातून जनजागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर रंगलेल्या शाहिरी जलसा कार्यक्रमात शाहीर वसंत डंबाळे, शाहीर कान्हू सुंबे, लोककलावंत कारभारी वाजे, नंदा साबळे, गोरक्षनाथ धस आदींसह कलाकारांनी समाजसुधारकांचे कार्यावर गीत गायली. प्रा. स्वाती सुडके यांनी फुले दांम्पत्याचे जीवन कार्य या विषयावर व्याख्यान दिले. पाहुण्यांचे स्वागत महात्मा फुलेंच्या जीवनचरित्रावरील पुस्तके देऊन करण्यात आले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सामाजिक क्रांतीसाठी आता सर्वांनी सहभाग घेऊन पुढे आले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सामाजिक संस्थांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देऊन सहकार्य केले पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांच्या कार्यातून सर्वांनी आदर्श घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार पोपट बनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नयना बनकर, बाळासाहेब पाटोळे, डॉ. संतोष गिर्हे, शरद वाघमारे, दत्ता वामन, कांचन लड्डे आदींनी परिश्रम घेतले.
