विरोधकांचा धुव्वा उडवीत सर्वच्या सर्व उमेदवार विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील चिंचाळे व गडदे आखाडा ग्रुप सोसायटीच्या निवडणुकीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले असून, विरोधकांचा पुरता धुव्वा उडाला. एकूण 322 मतदार संख्या असलेल्या सोसायटीत 282 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हनुमान तरुण मंडळाच्या एकूण बारा उमेदवारांपैकी निवडणूक होत असलेल्या सर्वच्या सर्व उमेदवार जवळपास 100 ते 110 मतांच्या फरकाने निवडून आले.
या विजयाचे सर्व श्रेय हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना व सभासदांना असल्याचे नारायणराव तमनर यांनी सांगितले.गेल्या पाच वर्षात पूर्णपणे पारदर्शी कारभार केल्यानेच सभासदांनी मतदानातून कौल दिला. विरोधी वीरभद्र जनसेवा मंडळाला मात्र एकही जागा मिळवता आली नाही. शिवाय सर्वच्या सर्व उमेदवारांना 80 ते 85 एवढ्याच मतांवर समाधान मानावे लागले. इतर मागास प्रवर्गाची जागा रिक्त असल्याने बारा जागेवरील विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस.वाय. आगळे यांनी करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली व विजयाच्या घोषणा दिल्या. विजय सभेत विद्यमान चेअरमन नारायणराव तमनर यांनी सोसायटीने पिक कर्ज म्हणून 1 कोटी 20 लाख रु. इतका कर्जपुरवठा शेतकर्यांना कोणत्याही गटाचा विचार न करता केल्याचे सांगितले. तसेच जून 2022 अखेर संस्था बँक पातळीवर शंभर टक्के वसुलीस पात्र होईल असा विश्वास व्यक्त केला.
विजयी झालेल्या उमेदवारांनामध्ये सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघातून जोरी सुनिता फकीरचंद (196 मते), गडदे तुकाराम लहानु (192 मते), ढाकणे बाबासाहेब पांडुरंग (188 मते), आघाव दगडू भिवा (186 मते), बाबाजी सखाराम (185 मते), चितळकर लहानबाई जालिंदर (185 मते), सांगळे जालिंदर मच्छिंद्र (184 मते), ज्ञानदेव भाऊसाहेब (178 मते), तर विरोधी गटातील उमेदवारांना 75 ते 87 इतकी मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघ पवार विठ्ठल सोमा (195 मते), महिला राखीव प्रतिनिधी मतदार संघ कोळसे रुपाली नवनाथ (189 मते), तमनर निर्मला नारायणराव (188 मते) तर विरोधी गटातील उमेदवारांना 83 ते 84 इतकी मते मिळाली. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघ रिक्त पद, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून गडदे दत्तात्रय लहानु यांना 187 मते मिळाली. हा विजयश्री खेचून आणण्यासाठी हनुमान तरुण मंडळाचे सुभाष आघाव, मोहनराव जोरी, नामदेव आघाव, बाळासाहेब जोरी, कुशीनाथ गडधे, बाबासाहेब वडीतके, योगेश सानप, कैलास हाके, रमेश गडदे, बाबासाहेब कोळसे आदींनी परिश्रम घेतले. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.