• Fri. Jun 6th, 2025

शेतरस्त्यांच्या हद्द निश्‍चितीसाठी पाथर्डी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

ByMirror

Oct 5, 2024

शेतरस्त्यांच्या हद्द निश्‍चिती करून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग खुला करा -शरद पवळे

शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे तहसीलदारांकडून आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याअभावी निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर व शेतरस्त्यांच्या हद्द निश्‍चितीच्या मागणीसाठी पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात महाराष्ट्र शिव पानंद शेतरस्त चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, पोपट केरू शेळके, शामराव आगळे, विकास जाधव, विठ्ठल चितळे, अशोक कचरे, पोपट जाधव, अशोक आंघळे, आदिनाथ शिमधुकर निवंडे, विजय कचरे, सचिन शेळके आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


रस्त्याअभावी शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने शेतजमीनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, अर्ज करण्यापासून ते कोर्टाच्या अंतीम निकालापर्यंतचा शेतकऱ्यांचा पिढयान-पिढया चाललेला संघर्ष थांबविण्यासाठी शिवपाणंद शेतरस्ता कृती समिती पाथर्डी यांच्या वतीने तहसील कार्यालय संबंधी बैठकीचे आयोयजन केले होते. शेतकऱ्यांनी पाथर्डीचे नायब तहसीलदार द्विगविजय पाटील यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत तहसील कार्यालयाचा कारभार कर्मचारी सांभाळत असल्याचा आरोप केला. या कामासाठी पुन्हा शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नका! अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शरद पवळे यांनी दिला. तर शेतरस्त्यांच्या हद्द निश्‍चिती करून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग खुला करण्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिवपानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे. शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या वाटेची आवश्‍यकता असते. शिवपानंद शेत रस्त्यांचा प्रश्‍न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून शिव, शेत व पानंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची मोजणी व शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्‍चिती करावी, तहसील कार्यालयातील प्रलंबित शेत रस्ता केसेस तातडीने निकाली काढाव्यात, शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना ग्राम शेत रस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावेत, तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात, दर्जे दर्जेदार शेत रस्ते करावेत, शेत रस्त्या अभावी पडीक राहणाऱ्या शेतजमिनी धारकांना विनाअट नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.


तहसीलदारांनी मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, तुमच्या वेदना मी समजू शकतो. शासन निर्णयची अंमलबजावणी करण्यासंदर्भात परिपत्रक काढण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा सत्कार करत आपले आंदोलन मागे घेतले.
–—
शिव, पानंद शेत रस्त्यांची मोजणी व हद्द निश्‍चित नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये शेतरस्त्यांमुळे निर्माण होणारे वाद वाढत चालले आहे.11 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयाच्या अंमलबजानीसाठी प्रशासकीय न्यायालयीन जनआंदोलन, जनजागृतीद्वारे शेतकऱ्यांच्या संघर्षला पुर्णविराम देण्याच काम महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून करत राहणार -शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)
–—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *