स्वराज्य प्रतिष्ठान व कामगार संघटनेचा सामाजिक उपक्रम
मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच सहकार्य राहणार -योगेश गलांडे
नगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान, स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचा वाढदिवस वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसह साजरा करुन, इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी नरेश शेळके, सुनिल शेवाळे, अशोक शेळके, शंकर शेळके, अमित बारवकर, दिपक गिते, विवेक घाडगे, प्रदिप करांडे, इंजि. अन्वर शेख, कामगार प्रतिनिधी, वसीम शेख, स्वप्नील खराडे, प्रदिप दहातोंडे, दीपक परभाणे, जितेंद्र तळेकर, अभिजित सांबारे, अजिनाथ शिरसाट, नामदेव झेंडे, सोमनाथ बारबोले, किसन तरटे, रामनाथ घुगे, संतोष शेवाळे, सचिन खेसे, गौरव पाटोळे, वैष्णव गलांडे, सोमनाथ आंधळे, चैतन्य कोंबडे, निलेश शेवाळे, तुषार शेवाळे, अमोल घुटे, नितीन खेसे, पवन क्षीरसागर, शिवराज गलांडे, महेश थोरवे, स्वप्नील भरड, संदीप मगर आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरेश शेळके म्हणाले की, राजकारण व समाजकारण करताना योगेश गलांडे सातत्याने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम करत आहे. मूकबधिर विद्यालयतील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे नेहमीच सहकार्य लाभत आहे. सर्वसामान्य कामगारांच्या हितासाठी त्यांचा संघर्ष सुरू असून, चळवळीतून व युवा सेनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक दिलीप जगधने यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
योगेश गलांडे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविण्यात येत आहे. समाजातील घटक असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकातील विद्यार्थ्यांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज असून, आपल्या आनंदात त्यांना समाविष्ट करुन प्रेम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य केले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच बोल्हेगाव येथील साई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. गलांडे यांनी कामगार वर्गातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचे आश्वासन दिले. अपंग संजीवनी सोसायटीच्या वतीने स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व कामगार संघटनेचे आभार मानण्यात आले.