• Wed. Jul 2nd, 2025

वंजारी समाजाचे 25 ऑगस्टला शहरात दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

ByMirror

Aug 14, 2024

हा संमेलन सामाजिक समतेची पायभरणी ठरेल -राजकुमार आघव पाटील (स्वागताध्यक्ष)

मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- वंजारी समाज महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन 25 ऑगस्ट रोजी शहरात होणार आहे. निर्मलनगर, संत भगवान बाबा चौक येथील गंगा लॉन्स मध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनात सर्व समाज बांधव व साहित्यिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.


सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, संध्याकाळी 6 वाजे पर्यन्त विविध साहित्यिक कार्यक्रमांनी हा संमेलन रंगणार आहे. समाजाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक होणार आहे. हा संमेलन सामाजिक समतेची पायभरणी ठरेल व भविष्यातील नवक्रांतीचा आरंभ असणार असल्याची भावना संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्‍वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघव पाटील, स्वागत अध्यक्ष रेणुका वराडे, सहस्वागत अध्यक्ष घनश्‍याम बोडखे, निमंत्रक जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर, युवा जिल्हाध्यक्ष अर्जुन वायभासे यांनी व्यक्त केली आहे.


डिसेंबर 2022 मध्ये नाशिक येथे वंजारी समाजाचे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पाडले. याचवेळी सामाजिक संस्कृतीला बळकटी मिळाली पाहिजे, म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यात द्विवार्षिक संमेलन संमेलन घेण्याचा निर्णय झाला. याच निर्णयाच्या अनुषंगाने 25 ऑगस्टला शहरात दुसरे राज्यस्तरीय संमेलन होत आहे. या संमेलनासाठी मावळते संमेलनाध्यक्ष प्रा.वा.ना. आंधळे यांनी नांदेड येथील साहित्यिक प्रा. डॉ. संगीता घुगे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड घोषित केली आहे.

संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप उपस्थित राहणार आहेत. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिकाताई राजळे, रोहित पवार, वंजारी महासंघाचे संस्थापक गणेश खाडे, उद्योगपती बुधाजीराव पानसरे तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागातील साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे.


या संमेलनात सामाजिक समता निर्माण होणे, यासाठी ऐतिहासिक पाऊल म्हणून सामाजिक समतेचे बीजे रोपण होण्यासाठी विविध समाज व धर्मातील साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे वंजारी समाज महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *