रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात शहरातील युवकांचा प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
देशात जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक -डॉ. राजेंद्र गवई
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास कोणत्या समाजाचा किती टक्के वाटा आहे? हे लक्षात येणार आहे. त्यामुळे मागास राहिलेल्या समाजांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन विकासात्मक वाटचाल करणे सोयीस्कर राहणार आहे. लोकशाही देशात राहून भाजपचे आमदार नितेश राणे मुस्लिम समाजाला देत असलेल्या धमक्या निषेधार्ह आहे. आरपीआयशी मोठा मुस्लिम समाज जोडलेला आहे. त्यांच्या सुरक्षेची हमी देखील आरपीआय ने घेतलेली असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) जिल्हा कार्यकारिणीची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. गवई बोलत होते. या बैठकीत अनेक युवक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला, तर अनेक कार्यकर्त्यांची विविध पदावर नियुक्ती करुन डॉ. गवई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीसाठी राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, संपदा म्हस्के, पूजा साठे,कमल वाघमारे, अलका बोर्डे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, शहर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी नईम शेख, शेवगाव तालुका अध्यक्ष अंकुश कोल्हे, राहुरी तालुका अध्यक्ष लखन सरोदे, शहरजिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी अजीम खान, युवक शहर अध्यक्ष अमोल खरात, नगर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, शहर सरचिटणीस विनीत पाडळे, सुफीयान काझी, अक्षय पाथरीया, रवी कानडे, निजाम शेख, जामखेड तालुका अध्यक्ष आदिल शेख, अजय पंडित, शहर संघटक बंटी बागवान, जावेद सय्यद, अरबाज शेख, जमीर शेख, हुसेन चौधरी, इम्रान शेख, मुन्ना भिंगारदिवे, दीपक गायकवाड, प्रतीक शिंदे, अर्पित कांबळे, हर्षद कांबळे, राहुल पाडळे, संकेत वैराळ, केतन कांबळे, पियुष पंडित, कृष्णा पाडळे, सिद्धेश आंधळे, मंगेश आंधळे, दर्शन लाटे, गणेश बोरुडे, बाबा शिंदे, तुषार थोरात, निशांत थोरात, विठ्ठल थोरात, सुधाकर थोरात, प्रणव गायकवाड, मोहित थोरात, अविनाश थोरात, अनिकेत पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे डॉ. गवई म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात व तालुकास्तरावर विधानसभेच्या दृष्टीकोनाने दौरे सुरु आहेत. राज्यातील सर्वच मतदार संघाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, रिपब्लिकन पक्ष 100 ते 150 जागा लढवण्याच्या विचारात आहे. महाविकास आघाडीकडून सन्मानाने जागा न मिळाल्यास वेगळा निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीकडून घटक पक्ष म्हणून डावलले गेल्यास वेळप्रसंगी महायुतीकडे जाण्याचा पर्याय देखील निवडला जाणार आहे. शहरासह जिल्ह्यात पक्षाचे काम उत्तमप्रकारे सुरु असल्याबद्दल त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
सुशांत म्हस्के म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गवई यांच्या भूमिका व निर्णयाला सर्व भिमसैनिकांचा पाठिंबा राहणार आहे. त्यांनी योग्य निर्णय घेवून कार्यकर्त्यांना आदेश द्यावे. जिल्ह्यात देखील रिपाईच्या माध्यमातून पक्ष बांधणीचे कार्य उत्तमपणे सुरु असून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युवकांचे उत्तमप्रकारे संघटन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजातील महिला व युवक असुरक्षित असून, जिल्ह्यात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहे. जातीय अत्याचार रोखण्यासाठी रिपाईच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत जयश्री सुदेश गायकवाड यांची महिला आघाडीच्या शहरजिल्हा कार्याध्यक्षपदी, देवेंद्र संतोष वाघमारे यांची युवक शहर कार्याध्यक्षपदी, रोहित भाऊसाहेब थोरात यांची नगर तालुका युवक शहर कार्याध्यक्षपदी व दिनकर भालेराव यांची विध्यार्थी आघाडीच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुण्याहून आलेले गोल्डन मॅन राजेश नायर यांचा रिपाईमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला व त्यांची देखील पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.