स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईडच्या कामगारांची विसर्जन मिरवणुक रंगली
सर्व धर्मिय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील कामगारांनी पाच दिवसाच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत स्थापन केलेल्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणुक उत्साहात काढून गणरायाला निरोप दिला. सर्व धर्मिय कामगारांनी एकत्र येवून धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविले.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या हस्ते आरती करून श्रीगणेशाची विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्लांट हेड संदीप मुनोत, क्लस्टर हेड बसवराज बकाली, सौरव मुखर्जी, पवन मोरे, सौ.हेमा शेळके, सौ.मनिषा झावरे, वाळके, जंजिरे, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे, जनरल सेक्रेटरी योगेश गलांडे, सुनील कदम, अभिजित सांबारे, रमेश शिंदे, राहुल जगधने, भरत दिंडे, बाबासाहेब गायकवाड, संजय बागल, मच्छिंद्र पाटील, किसन तरटे, महेश लांडगे, सुरेश लबडे, संतोष तोडमल, कृष्णा सत्रे, शेखर गुंजाळ, संतोष वाघमारे, विकास तरवडे, स्वप्निल खराडे, प्रदीप दहातोंडे, अभिजीत सांबारे, अजिनाथ शिरसाठ, जितेंद्र तळेकर, संतोष शेवाळे, अमोल ठोकळ, गणेश ठोंबरे, शरद थोरात, दादासाहेब माने, उमाशंकर, गोरख खंडागळे, विशाल सुंबे, हर्षद बिरंगळ, सचिन दाताळ, सोमनाथ बारबोले, रामनाथ घुगे, वसीम शेख, सचिन खेसे, अविनाश कर्डिले, सोमनाथ शिंदे, महेश जाजगे, धनजय राऊत, प्रविण शिंदे, सोमनाथ मुळे, विकास कुलट, सचिन लवांडे, अभय जोरवे, शिवाजी चौरे, नंदु नरवडे, गणेश पेहरे आदी उपस्थित होते.

माणिक चौधरी म्हणाले की, डीजेच्या आवाजाने कानाला त्रास होतो, तर लेझरनी डोळ्याला त्रास होत आहे. स्वराज्य कामगार संघटना व एक्साईड कंपनीने पारंपारिक ढोल पथकासह काढलेली मिरवणूक प्रेरणादायी आहे. उत्सव उत्सवाच्या जागेवर साजरा झाल्यास समाजाला त्रास होणार नाही. प्रत्येक सण-उत्सव साजरा होत असताना तो पर्यावरणपुरक कसा साजरा करता येईल या दृष्टीने देखील योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पारंपारिक ढोल पथकासह वाजत-गाजत जल्लोषात गणरायाची मिरवणुक एमआयडीसीत रंगली होती. मोठ्या उत्साहात निघालेल्या मिरवणुकीत कामगारांनी ठेका धरला होता. संघटनेचे पदाधिकारी व कंपनीतील अधिकाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! चा गजर केला.
पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाप्पाला निरोप देताना कामगार वर्ग भारावून गेले. गुलालाची उधळण, पारंपारिक ढोल पथक व गाण्यांच्या तालावर वाजत-गाजत जल्लोषात गणरायाची मिरवणुक काढण्यात आली होती. मोठ्या उत्साहात निघालेल्या मिरवणुकीत कामगारांनी ठेका धरला होता. विळद घाट येथील तलावात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
