तर बसण्यासाठी सतरंज्या भेट
ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास परिस्थिती अडवी येत नाही -जागृती ओबेरॉय
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सक्षमीकरणासाठी व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने लालटाकी, भारस्कर कॉलनी येथील स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवन मधील विद्यार्थ्यांना अभ्यासाठी टेबल व बसण्यासाठी सतरंज्या भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लीडर निशा धुप्पड, डॉ. सिमरन वधवा, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, गीता नय्यर, वीना ओबेरॉय, डॉ. सोनाली वहाडणे, बालभवनच्या समन्वयक रुबिना शेख, सुनिता सोळसकर, संतोष बेदरकर आदी उपस्थित होते.

जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही. स्वत:मध्ये आत्मविश्वास असण्याची गरज आहे. परिस्थितीची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जीवनातील ध्येय गाठण्याची गरज आहे. शिक्षणानेच परिस्थिती बदलण्याची शक्ती असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना ध्येय ठरविण्याचे आवाहन केले.
डॉ. सिमरन वधवा यांनी प्रेरणादायी कथेतून यशाचे गुपीत विद्यार्थ्यांसमोर उलगडले, तर स्वतःमधील क्षमता ओळखण्याचे आवाहन केले. प्रत्येकात वेगवेगळ्या क्षमता असून, त्या क्षमता ओळखल्यास यश मिळवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रुप लीडर निशा धुप्पड यांनी गरजू घटकातील विद्यार्थी हे समाजातील घटक असून, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी सेवाप्रीत गरजू घटकांना शिक्षणासाठी आधार देत असल्याचे स्पष्ट केले.
सेवाप्रीतच्या महिलांनी बालभवन मधील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे व चॉकलेटचे वाटप करुन त्यांच्याशी संवाद साधला. या उपक्रमासाठी सेवाप्रीतच्या सदस्या नताशा धुप्पड, गीता धुप्पड, वीना ओबेरॉय, वीना खुराणा, रिटा बक्षी, अर्चना ओबेरॉय, डॉ. सोनाली वहाडणे, अंशू कंत्रोड, रविंदर धुप्पड, संगीता अॅबट, दिशा ओबेरॉय यांचे सहकार्य लाभले. बालभवनच्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल रुबिना शेख यांनी आभार मानले.