अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आसराबाई गोरख जाधव यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 68 वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरीचित होत्या.
त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे, दीर, भाई, जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे. निमगाव वाघाचे डॉ. विजय जाधव यांच्या त्या मातोश्री व सरपंच रुपाली विजय जाधव यांच्या त्या सासू होत्या.