केडगावच्या मोहिनी नगरला वृक्षरोपण करुन झाडे जगविण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा लोकार्पण
केडगावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र या -सुवर्णा जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- भावी पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाच्या अंगणात झाडे फुलले पाहिजे. समाजसेवेला वृक्षरोपणाची जोड मिळाल्यास पर्यावरण संवर्धन होणार आहे. केडगावचा विकास साधण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन समाजसेवा या ध्येयाने प्रत्येकाने वाटचाल करावी. केडगावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगदान दिल्यास हरित व सुंदर केडगावचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा सचिन जगताप यांनी केले.
केडगाव येथील मोहिनी नगर परिसरात वृक्षारोपण अभियान राबवून लावलेली झाडे जगविण्यासाठी ठिबक सिंचनने पाणी देण्याच्या पाईपलाइन प्रणालीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सुवर्णा जगताप बोलत होत्या. नगरसेविका तथा महिला व बालकल्याणच्या माजी सभापती लताताई शेळके यांच्या संकल्पनेतून एक वृक्ष एक मित्र उपक्रमातंर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एक वृक्ष एक मित्र समितीचे कार्यवाह बाबासाहेब वायकर, सामाजिक कार्यकर्ते पै. सुरज शेळके, नगरसेविका गौरीताई ननावरे, नगरसेवक राहुल कांबळे, उद्योजक गणेश ननावरे, युवा कार्यकर्ते सोनू घेंबुड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भैरूशेठ उर्फ श्याम कोतकर, महेश सरोदे, सचिन सरोदे, बचत गटाच्या अध्यक्षा कदम ताई, कोमल वायकर, नाथाभाऊ कोतकर, नवनाथ कोतकर, बाळासाहेब उर्फ बच्चन कोतकर, भरत भंडारी, इंजि. उमेश ठोंबरे, इंजि. शुभम नलवडे, अभिषेक नलवडे, जालिंदर कोतकर, सुनिल कोतकर, नवनाथ कोतकर, शैलेश सुंबे, प्रवीण ठोंबरे, प्रसाद ठोंबरे, नीरज वाडगे, शुभम आंबेकर, सागर बडे, माजी सैनिक किरण भापकर, सुरेखा धाईंजे, सीमा खांदवे, गीता भस्मे आदींसह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे सुवर्णा जगताप म्हणाल्या की, केडगावमध्ये राबविण्यात आलेला वृक्षरोपण व संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांना वृक्षरोपणाचा मोठा छंद आहे. विविध झाडे त्यांनी वाढवली आहे. त्यांच्या प्रेरणेने केडगावकर भविष्यातील वाटचाल करत आहे. परमेश्वराने समाज सेवेसाठी शक्ती दिली, या भावनेने ते योगदान देत आहे. केडगावला पाणी आणून त्यांनी स्वप्नपुर्ती केली. केडगावकरांप्रती त्यांच्या मनात मोठी आस्था असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात महिला व बालकल्याणच्या माजी सभापती लताताई शेळके म्हणाल्या की, केडगावकरांना हक्काचे पाणी देऊन संदीप कोतकर यांनी या भागात नंदनवन फुलवले. हा परिसर हिरवाईने फुलविण्यासाठी त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील आहे. पर्यावरणाच्या प्रश्नामुळे सजीवृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले असून, भविष्यातील धोके टाळण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे. यासाठी केडगावमध्ये एक वृक्ष एक मित्र समिती स्थापन करुन लावलेला प्रत्येक झाड जगविला जाणार आहे. यासाठी ठिबक सिंचन प्रणाली देखील सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पाहुण्यांचे स्वागत पै. सुरज शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका सूर्यवंशी, कोमल बनसोडे, सौ. बलदोटा, सिंधू इबीतदार, मंदाताई कुलधर, विमल ठोंबरे, वंदना भोसले, अकोलकर, ढगे, बोरुडे, बडे, दराडे, बोडखे, भापकर, शुभांगी वाडगे, दहिफळे, रणसिंग, बोरकर ताई, घोडके, नन्नवरे, गुरव, पिरजादे यांनी परिश्रम घेतले.
