वृक्षारोपण व लावलेल्या झाडांचे संवर्धन करुन राबविले स्वच्छता अभियान
नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ
मे महिन्यात झालेला मुसळधार पाऊस हा पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नाचा इशारा -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या पर्यावरण संवर्धन सप्ताहाचे शुभारंभ चांदबिबी महाल येथे विविध उपक्रमांनी करण्यात आले. दि. 1 ते 7 जून दरम्यान पर्यावरण संवर्धन सप्ताहातंर्गत वृक्षारोपण, संवर्धन, स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

चांदबिबी महाल येथे 1 जून रोजी असलेल्या ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस सामुदायिकपणे वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. तर लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देवून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आले. यावेळी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा संकलन करण्यात आला. पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन नागरिकांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.
ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य सीए रवींद्र कटारिया यांची मुलगी सीए धनश्री पुनीत बच्छावत यांनी अहमदाबाद आयआयएम येथून एक्झिक्युटिव्ह ॲल्युमिनी झाल्याबद्दल ग्रुपचे वतीने तिचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिनशेठ चोपडा, जहीर सय्यद, दिलीपराव ठोकळ, सीए रवींद्र कटारिया, सीए श्रेयांश कटारिया, भारतीताई कटारिया, सीए श्रेणीक कटारिया, अनुष्का कटारिया, पार्श बच्छावत, शिवाय कटारिया, प्रांजली सपकाळ, सुरेखाताई तोरडमल, संगीता सपकाळ, कांताताई गांधी, विद्याताई मिसाळ, सर्वेश सपकाळ, शेषराव पालवे, बाळासाहेब पाटील, जालिंदर अळकुटे, दशरथराव मुंडे, सखाराम अळकुटे, भीमराव फुंदे, रावसाहेब कोकणे, नामदेवराव जावळे, कांता वाघुले, अभिजीत सपकाळ, दीपकराव धाडगे, रतनशेठ मेहेत्रे, मनोहर दरवडे, दिलीप गुगळे, अशोक पराते आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज आहे. जंगल तोड झाल्याने पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले असून, भविष्याचा विचार करुन वृक्षरोपण व संवर्धन चळवळ काळाची गरज बनली आहे. मे महिन्यात झालेला मुसळधार पाऊस हा पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नाचा इशारा असून, सर्वांनी या चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
सीए रवींद्र कटारिया यांनी पर्यावरण संवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपची वर्षभर सुरु असलेली चळवळ प्रेरणादायी आहे. पर्यावरणाच्या निसर्गचक्रात मनुष्याने अवास्तव हस्तक्षेप केल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे. यामुळे मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. मनुष्याला जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सचिन चोपडा यांनी ऑक्सीजन देण्याचे काम झाडे करीत असतात, त्यांच्याकडून मिळणार्या ऑक्सीजनरुपी श्वासासाठी वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वसुंधरा संवर्धनेचा वसा वृक्षरोपणाने जपला जाणार असल्याचे सांगितले.
सीए धनश्री बच्छावत हिने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वेळोवेळी झालेल्या सन्मानाने पुढील वाटचालीस प्रेरणा मिळाली. कुटुंबीयांच्या वतीने झालेला सन्मान हा आनखी चांगले कार्य करण्यास ऊर्जा देत असल्याचे, सत्काराला उत्तर देताना सांगितले. या अभियानात सुधीरशेठ कपाळे, विठ्ठल (नाना) राहिंज, अनिलराव तोरडमल, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, प्रशांत चोपडा, ईवान सपकाळ, दीपकराव बडदे, अविनाश जाधव, विकास भिंगारदिवे, अनंत सदलापूर, सरदारसिंग परदेशी, रामनाथ गर्जे, अविनाश पोतदार, सुभाष पेंढुरकर, अनिलराव सोळसे, दिनेश शहापूरकर, राजू कांबळे, किरण फुलारी, सूर्यकांत कटोरे, दीपक मेहतानी, मुन्ना वाघस्कर, शशिकांत पवार, राजूशेठ लुणिया, पप्पू फुलारी, विनायकराव कुलकर्णी, सुहास देवराईकर, नवनाथ वेताळ, योगेश चौधरी, प्रशांत भिंगारदिवे, परबजीत सागू, नवनाथ खराडे, कुमार धतुरे, शिवांश शिंदे, यश कनोजिया, संतोष मिसाळ सहभागी झाले होते.